शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

जिल्ह्यातील ३०१ शाळांचं भवितव्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:48 IST

सातारा : शाळेत डोकी किती? हे पाहून शिक्षणाचे धोरण ठरले जाऊ लागले आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय आहे?, याचा विचार शासन करणार आहे की नाही?, असे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळातून विचारले जाऊ लागले आहेत. जिल्ह्यातील ७२ शाळा बंद करण्याच्या नव्या फतव्यानुसार दुर्गम भागातील मुले शालाबाह्य होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली ...

सातारा : शाळेत डोकी किती? हे पाहून शिक्षणाचे धोरण ठरले जाऊ लागले आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय आहे?, याचा विचार शासन करणार आहे की नाही?, असे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळातून विचारले जाऊ लागले आहेत. जिल्ह्यातील ७२ शाळा बंद करण्याच्या नव्या फतव्यानुसार दुर्गम भागातील मुले शालाबाह्य होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान, एकूण ३०१ शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे.कमी पटाच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याबाबत शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी आदेश काढले आहेत. ० ते १० पट असणाºया सातारा जिल्हा परिषदेच्या ३०१ प्राथमिक शाळांचा समावेश होण्याची शक्यता आहे. शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केले आहे. ही कार्यवाही लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कमी पटामुळे राज्यातील सुमारे १३०० प्राथमिक शाळांवर गंडांतर आले आहे.प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण संचालकांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तातडीचे परिपत्रक पाठविले आहे. कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत चांगल्या गुणवत्तेमुळे पटसंख्या वाढत असलेल्या शाळेत समायोजन करावे, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे.दरम्यान, जिल्ह्यात दहाहून कमी पटसंख्या असलेल्या ३०१ प्राथमिक शाळा आहेत. या शाळा आता बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नजीकच्या कोणत्या शाळेत समायोजन करायचे? याबाबतही माहिती जिल्हा परिषदेने तयार केली असल्याचे वृत्त आहे.शिक्षण संचालकांनी पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यात पालकांमध्ये गुणवत्तेबाबत चांगलीच जागरुकता आली आहे. त्यामुळे चांगली गुणवत्ता असलेल्या शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे.कमी गुणवत्तेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील तरतुदींचे उल्लंघन न करता कमी पटाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करणे योग्य आहे.दरम्यान, कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या कमी होत असल्याच्या शिक्षण संचालकांच्या मताशी शिक्षक संघटना सहमत नाहीत. शाळेचा पट कमी होण्यास केवळ गुणवत्ताच कारणीभूत नाही. स्थानिक राजकीय व्यक्तींच्या खासगी शाळा, नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळांना दिलेली मंजुरी हेही कारणीभूत आहे.शासनाचा निकष काय सांगतो?शासनाच्या निकषानुसार ३० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक नेमण्यात येतो. मात्र दुर्गम, डोंगरी भागात विद्यार्थी पटसंख्या अत्यल्प आहे. अनेक ठिकाणी द्विशिक्षकी शाळा आहेत. सर्व शिक्षण अभियानांतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. शाळा बंद झाल्या तर मुलांचा हा हक्क राखला जाणार आहे का?, असा शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.कमी पटाच्या शाळेतीलगुणवत्ता कमी कशी?कमी पटाच्या शाळेत गुणवत्ता कमी आहे याला आधार काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न शिक्षक आमदारांकडून आक्रमकपणे मांडला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिक